
मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ हे त्यांच्या दमदार अभिनयाने ओळखले जातात. धनंजय माने, बाजीराव रणगाडे, पांडू हवालदार अशा अनेक भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केल्या. अशोक सराफ यांच्या ५० वर्षांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला उजाळा देताना त्यांचा सन्मानही करण्यात आला. जवळपास पाच दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका आजारामुळे त्यांना बोलता येत नव्हते. त्यासाठी त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ते हजेरी लावताना दिसतात. मी या क्षेत्रातून काम कधी सोडणार हे अशोक सराफ यांनी अभिनेते मिलिंद गवळी यांच्याजवळ बोलून दाखवले होते. अशोक सराफ म्हणतात की, ‘ज्यावेळेला सकाळी उठल्यानंतर मला असं वाटेल “अरे यार आज शूटिंग आहे”, शूटिंगचा मला मला कंटाळा येईल त्या दिवशी मी काम करायचं थांबवेल”. असं त्यांनी मिलिंद गवळी यांना म्हटलं होतं.

मिलिंद गवळी यांनी यासंदर्भात नुकतीच एक पोस्ट लिहिली होती. तुमच्या कामावर जर तुमचं प्रेम असेल तर ते काम करायला तुम्हाला नक्कीच आवडेल.”असेल हरि तर देईल खाटल्यावरी ” किंवा “नशिबात असेल तर मला मिळेल” असं म्हणून चालत नाही तुम्हाला स्वतःला हात पाय हलवावेच लागतात, कष्ट करावे लागतात, जे काही ध्येय गाठायचं असेल, त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावं लागतं, आणि असं नाहीये की कोणाला नशिबाने मिळत नाही, किंवा हरी खटल्यावर देत नाही, पण जे काही कष्ट न करता मिळालेलं असतं ते फार काळ टिकतही नाही असा माझा अनुभव आहे, कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळाच असतो, आणि कष्ट करणे म्हणजे अगदी गदा मजदूरी करणे असे ही नाही, कष्ट करण्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचे आहे, कष्ट करणे म्हणजे दिलेल्या वेळा पाळणे, यालाही खूप महत्त्व आहे, punctuality हा शब्दच बऱ्याचशा लोकांच्या dictionary मध्येच नसतो. आणि असं नाहीये की त्यांना यश मिळत नाही, मिळतं त्यांना पण यश मिळतं, खूप यश मिळतं, Punctual नसणारे आणि indiscipline कलाकार उदाहरणार्थ राजेश खन्ना, गोविंदा, शत्रुघन सिन्हा आणि disciplined, punctual कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन च नाव घेतलं जातं शशि कपूरचं नाव घेतलं जातं नंतरच्या पिढीतले आमिर खान, अक्षय कुमार यांचं नाव घेतलं.

तुमचं जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर तुम्हाला , तुमचं काम कष्टाच वाटत नाही, एकदा मला अशोक सराफ म्हणाले होते, की ज्या वेळेला सकाळी उठल्यानंतर मला असं वाटेल “अरे यार आज शूटिंग आहे” शूटिंगचा मला कंटाळा येईल, त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन, आणि खरंच मला तर सकाळी पाच वाजता उठल्यावर शूटिंग करायचा उत्साह आसतो , अगदी फिल्मचं किंवा सिरीयलचे शूटिंग असायला पाहिजे असं काही नाही अगदी मग हे आजचं आशय बरोबरच फोटोशूट असलं तरी तो उत्साह काही कमी होत नाही, तसाच उत्साह, तीच positive energy cameraman आशय मध्ये असते, सगळी अरेंजमेंट करणारा श्री मध्ये असते, दर्शना हजारे शानबाग ने तयार केलेले Costumes press iron करणारा संकेत मध्ये असते, मेकअप करणारा समीर म्हात्रे मध्ये, रुक्सार आणि राजू मध्ये असते, या सगळ्यांची collective, strong, positive energy, magic create करत असते. मग डोक्यावर कडक ऊन असलं तरी, घामाच्या धारा वाहत असल्या तरी, शूटिंग करत असताना मनावर थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करत असते असंच वाटतं