serials

मालिकेचा शेवटचा दिवस म्हणत स्टार प्रवाहच्या मालिकेने घेतला निरोप… त्याजागी येणार हि नवी मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका दाखल होत आहेत. त्यामुळे जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. येत्या ११ ऑक्टोबर पासून संध्याकाळी ६.३० वाजता “उदे गं अंबे” ही मालिका प्रसारित होत आहे. या नवीन मालिकेत मयुरी कापडने देवी आईची भूमिका साकारत आहे तर तिला देवदत्त नागे यांची साथ मिळत आहे. या मालिकेच्या एन्ट्रीमुळे साडेसहा वाजता प्रसारित होत असलेली “मन धागा धागा जोडते नवा” मालिकेला निरोप घ्यावा लागत आहे. आज या मालिकेच्या सेटवर शेवटचा सीन शूट करण्यात आला.

man dhaga dhaga jodte nava serial
man dhaga dhaga jodte nava serial

त्यानंतर कलाकारांनी केक कापून एकमेकांना भावनिक निरोप दिला. सार्थक आणि आनंदी पुन्हा एकत्र आले या गोड नोटवर मालिका संपवण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सार्थक हा घटस्फोटित आनंदीच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरु होतो. पण अनेक अडचणींवर मात करत ते दोघे नातं टिकवून ठेवताना दिसले. आनंदिवरच्या प्रेमाखातर सार्थक दुसरे लग्नही करत नाही. शेवटी सहा वर्षाने परत आलेली आनंदी त्याला भेटते आणि तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो.

man dhaga dhaga jodte nava serial exit
man dhaga dhaga jodte nava serial exit

अर्थात सार्थकच्या आईची अट असल्यानेच आनंदी सार्थक पासून दूर राहते पण आता या दोघांची पुन्हा एकदा भेट घडून येत आहे. सार्थक आणि आनंदीवरील प्रेमाखातर ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे मालिकेला निरोप देताना साहजिकच प्रेक्षक नाराज झाले आहेत. पण कुठल्याही कथानकाला शेवट हवा आणि ती योग्य वेळी संपवण्यात यावी अशीही प्रेक्षकांची मागणी असते. त्याचमुळे या मालिकेच्या जागी उदे गं अंबे ही अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button