news

मुलांचं पालनपोषण करण्याच्या नादात आपलं जगायचं राहून जातं पण आता मी …. जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य चर्चेत

जान्हवी किल्लेकर ही मराठी बिग बॉसच्या पाचव्या सिजनची सदस्य आहे. या घरातला दुसरा आठवडा जान्हवीने तिच्या भांडणाने चांगलाच गाजवला होता. मात्र वर्षा उसगावकर यांच्या अभिनयावर तिने शंका उपस्थित केल्याने जान्हवी सर्वच स्तरातून ट्रोल झाली आहे. तमाम कलाकारांनी जान्हवीच्या वागण्यावर राग व्यक्त करत तिला वर्षा उसगावकर यांची माफी मागण्यास भाग पाडले. दरम्यान या चुकी मुळे तिला भाऊच्या धक्क्यावर रितेशचा ओरडा खावा लागला. पण त्यानंतर जान्हवी भोवळ येऊन पडल्याने तिला ट्रोल करण्यात आले. दरम्यान आजच्या भागात ती एक लक्षवेधुन घेणारं वक्तव्य करताना दिसणार आहे.

jahnvi killekar and yogita bigboss marathi
jahnvi killekar and yogita bigboss marathi

योगिता आणि जान्हवी दोघीही एकत्रित गप्पा मारत असतात तेव्हा जान्हवीने तिच्या लग्नाचा विषय काढला. “माझं लग्न खूप लवकर झालं वयाच्या २२ व्या वर्षी मला मुलगाही झाला.पण यामुळे मी आता माझं करिअर करण्यासाठी पूर्णपणे मोकळी झाली आहे. मुलगा झाला तो आता मोठा होतोय. मला लग्नासाठी थांबायचं नाही आणि मुलासाठीही आता थांबायचं नाही मी पूर्णपणे फ्री आहे .आता हे सगळं त्याच्या फ्युचरसाठीच चाललं आहे. तो आता ३ रीतच शिकतोय पण त्याला फॉरेनमध्ये जायचंय तिथल्या युनिव्हर्सिटीत शिकायचंय”. जान्हवी असे म्हटल्यावर योगिता तिच्या बालपणात जाते आणि म्हणते की, “आपण या वयात होतो तेव्हा आपल्याला असं काहीच कळत नव्हतं दहावीपर्यंत आपल्याला याची कधीच काळजी नव्हती की काय करायचंय आपल्याला”.

पुढे जान्हवी तिच्या मुलाबद्दल म्हणते की, “त्याला हे आतापासूनच सगळं कळतंय. मी कधी जेव्हा मोठं घर घेईल तेव्हा त्याच्या शिक्षणासाठी ते विकावं लागलं तर मी ते विकेन, तू शिक. मला माहीतीये की पोरं मोठी झाल्यावर आपल्याकडे नाही बघत, पण ते आपलं कर्तव्य आहे आणि मला त्याच्या जीवावर नाही राहायचं. पण काय होतं ना की त्यांचं लाईफ सिक्युअर ठेवण्याच्या नादात आपण स्वतःसाठी ठेवणं विसरतो.” जान्हवीच्या या वक्तव्यावर योगिताने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तिलाही जान्हवीचं हे मत पटलेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button