serials

तो सीन बघितल्यानंतर रात्री २ वाजता मनोजच्या बायकोने मला फोन लावत म्हणाली …सुकन्या मोने यांनी सांगितला आभाळमायाच्या सीनचा किस्सा

झी मराठीच्या आभाळमाया या मालिकेने आजही प्रेक्षकांच्या मनात जागा बनवलेली आहे. नुकतेच झी मराठीला २५ वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने वाहिनीवर एक सोहळा आयोजित केला आहे. यावेळी आभाळमाया मालिकेची सर्व टीम मंचावर उपस्थित होती. मंदार देवस्थळी यांनी या मालिकेच्या गाजलेल्या एपिसोडची यावेळी आठवण काढली. ५३ आणि ५४ हे दोन एपिसोड आभाळमायाचे खूप गाजले. या एपिसोडचं ११ पानांचं स्क्रिप्ट दोन दिवस दोघांवरच चित्रित झालं. हे स्क्रिप्ट जेव्हा वाचण्यात आलं तेव्हा सेटवर १५ मिनिटं सगळेच शांत झाले होते. त्या सीनमध्ये सुधा रात्री ९ वाजता शरद जोशीला घराबाहेर काढते.

sukanya mone and manoj joshi abhalmaya serial
sukanya mone and manoj joshi abhalmaya serial

ह्या सिनचा लोकांवर खूप परिणाम झाला होता, असे सुकन्या मोने सांगतात. “या सीनच्या शूटवेळी मनोज जोशीला कुठेतरी लग्नाला जायचं होतं म्हणून त्याची बायको चारू तिथे सेटवर आली होती. तो सीन बघत असताना तिने मध्येच मनोजला घरी जाण्यासाठी बोलावले. आपण लग्नाला नाही, घरी जाऊ म्हणत ती मनोजला तिथून घेऊन गेली इतका तिच्या मनावर परिणाम झाला होता. तिने रात्री २ वाजता मला फोन केला. ‘तुझं आणि मनोजचं खरंच काही नाहीएना?’ मी म्हणलं असं का विचारतेस चारू? आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना!.

manoj joshi with wife charu joshi
manoj joshi with wife charu joshi

त्यावर ती म्हणाली , ‘म्हणूनच मला टेन्शन आलंय की माझी चित्रा नाही ना करणार तुम्ही?’…म्हणजे इतका तिच्या मनावर या गोष्टीचा परिणाम झाला की ती लग्नालाही गेली नाही, १ आठवडाभर तिच्या मनावर तो परिणाम होता की खरंच या दोघांचं काही चालू नाहीए ना?…” आभाळमाया या मालिकेतली चित्रा हे पात्र सुधाची सवत होती..ती तिची खास मैत्रीणही होती. तिच्या मृत्यूनंतर शरदने सुधाशी लग्न केले होते. त्यामुळे निश्चितच हा सीन पाहताना मनोज जोशी यांची पत्नी अस्वस्थ होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button