news

लागीर झालं जी मालिकेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण.. नव्या घराच्या नेमप्लेटने वेधलं लक्ष

आपण जिथे काम करतो तिथे आपल्या हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची ईच्छा असते. कलाकार म्हटलं की त्याला मुंबईत येणं भाग असतंच. त्यामुळे बहुतेक कलाकार स्ट्रगल करून आपल्या हक्काचं घर घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. गेल्या काही दिवसांत मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांचं हक्काचं घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. रुपाली भोसले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांनी त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. अशातच आता झी मराठीवरील मालिकेतील अभिनेत्याने मुंबईत घर घेतलं आहे. झी मराठीची मन झालं बाजींद ही मालिका तुम्हाला आठवत असेल. या मालिकेत बिग बॉसचा सदस्य वैभव चव्हाण आणि श्वेता खरात यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

actor riyaaz mulani home mumbai
actor riyaaz mulani home mumbai

याच मालिकेतील गुली मावशीचा मुलगा हृतिक म्हणजेच अभिनेता रियाझ मुलानी याने नुकतंच मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईत आलो तेव्हाच ठरवलं होतं की आपल्या हक्काच्या घरावर clap बोर्डची नेमप्लेट लावावी ज्याच्यावर आपल्या कुटुंबाचं नाव असावं. वेळ लागतो पण पाहिलेलं स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. आई वडील आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं”. असे म्हणत रियाझने त्याच्या या नवीन घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याच्या घराची ही खास नेमप्लेट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

मन झालं बाजींद या मालिकेमुळे रियाझ आणि वैभव चव्हाणची छान मैत्री झाली होती. वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर त्याने रियाझच्या या नवीन घराला सदिच्छा भेट दिली होती. रियाझ मुलानी हा मूळचा पुण्यातील इंदापूरचा. आय एम सॉरी, यारों की यारी,पोलीस लाईन, मन झालं बाजींद अशा प्रोजेक्टमधून रियाझ मुख्य भूमिका साकारताना दिसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button