जरा हटके

सिंघम चित्रपटातील शिवा आठवला? त्याच या मराठी अभिनेत्रीसोबत झालंय लग्न

पिळदार शरीरयष्टी आणि आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांना भुरळ घालणारा अभिनेता अशोक समर्थने आज अभिनय क्षेत्रात यशाचं मोठं शिखर गाठलं आहे. अशात तुम्हाला माहित आहे का? त्याची पत्नी देखील सिनेसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आज या बातमीतून ती अभिनेत्री नेमकी कोण आणि अशोक समर्थचा अभिनयातील इथ पर्यंत प्रवास जाणून घेऊ. अशोक समर्थ मूळचा तसा महाराष्ट्रातील बारामती येथील आहे. लहानपणापासून त्याला अभिनयासह पहिलवानगी करण्याची देखील आवड होती. १० वी १२ वीमध्ये असताना आपल्या गावी त्याने अनेक आखाड्यांमध्ये खेळ खेळला आहे.

actor ashok samarth wedding
actor ashok samarth wedding

त्याने बारामती येथूनच आपल शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या दिशेने धाव घेतली. शिक्षण सुरू असतानाच त्याला अभिनयाची गोडी लागली होती. पुढे त्याच्यातील नट त्याला मुंबईला घेऊन आला. मुंबई गाठल्यावर सर्वप्रथम त्याने छोट्या पडद्यावर आगण केले. त्याची पहिली मालिका माझिया प्रियाला प्रीत कळेना ही होती. लक्ष मालिका तुम्ही सर्वांनी पहिलीच असेल. यात अशोकने अभय कीर्तिकर ही भूमिका साकारली. या मालिकेत त्याच्या अभिनयात इतका सच्चेपणा होता की, अनेक व्यक्तींना आजही लक्ष म्हटल्यावर पहिले अशोकचा चेहरा आठवतो. मराठीतील तब्बल ५ वर्षे चाललेल्या या मालिकेने त्याला मोठी पसंती मिळाली. हीच मालिका त्याच्या अभिनयातील कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. पुढे त्याने आपलं अभिनयाचं जहाज बॉलिवूडकडे वळवलं. त्यानंतर इंसान या चित्रपटातून तो पहिल्यांदा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकला. पुढे रोहित शेट्टीच्या सिंगम चित्रपटात त्याला अभिनय करण्याची संधी मिळाली. त्याने यामध्ये शिवा नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली. त्याला मिळालेल्या या संधीच त्याने सोन केलं. त्यानंतर आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्याने आजवर मागे वळून पाहिलंच नाही. सिंगममधील त्याचे डायलॉग अजय देवगणच्या आता माझी सटकली या डायलॉग सारखेच फेमस आहेत.

singham film shiva wife sheetal pathak
singham film shiva wife sheetal pathak

अशात अभिनय करता करता २०१३ साली आलेला चित्रपट ट्रॅफिक जॅममध्ये त्याची ओळख अभिनेत्री शीतल पाठक बरोबर झाली. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत होते. एकत्र काम करता करता त्यांच्यात पक्की मैत्री झाली. त्यानंतर याच मैत्रीला त्यांनी प्रेमाचे नाव जोडले आणि २१ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. मिलिंद गवळी यांच्यासोबत कृपासिंधू मधून ती नावारुपाला आली. त्यानंतर तिने मंडळी तुमच्यासाठी कायपण, चेहरा, गाव माझं तंटामुक्त, तात्या विंचू लगे रहो, सामर्थ्य, बाय गो बाय अशा अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत ती झळकली आहे. दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याने आपणही एखादा चित्रपट दिग्दर्शित करावा अशी त्यांची इच्छा होती. आता त्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण जननी या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक समर्थ करताना दिसणार आहे. चित्रपटातच शूटिंग आता पूर्ण झाले असून या दोघांसह त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button