२ डिसेंबर रोजी अतुल अवताडे याने मुंबईच्या रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणीसोबत लग्नाचा घाट घातला. हे लग्न सोशल मीडियावर चांगल्याच प्रमाणात व्हायरल झालं होतं. अर्थात दोन मुलींसोबत लग्न केल्याने हे लग्न कायद्यात बसत नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अकलूज पोलीस चौकीत त्या तिघांविरोधात ४९४ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहिल्या पत्नीच्या हयातीत असताना दिसरे लग्न कायद्यात बसत नसल्याने अकलूज पोलिसांनी हे प्रकरण चौकशीसाठी हातात घेतले होते. त्यावर राज्य महिला आयोगा कडून देखील आवाज उठवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली होती.

मात्र आता ह्या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अतुल अवताडे ह्याचे अगोदरच एक लग्न झालास होते अशी माहिती आता चौकशीतून समोर आली आहे. अतुल चे अगोदरच एक लग्न झाले होते ही माहिती त्याने आमच्यापासून लपवून ठेवली होती ही बाब रिंकी आणि पिंकी समोर उघड झाल्याने या दोघींनी दाद मागितली आहे. सुरूवातीला अतुल पिंकी आणि रिंकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या तिघांनी संगनमताने लग्न केले असल्याचे स्पष्ट केले होते. आम्ही सज्ञान आहोत आणि या लग्नाला आमचा तिघांचीही संमती होती असे त्यांनी म्हटले होते. अतुल हा बीजनेसमन आहे त्याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. रिंकी आणि पिंकी यांच्याशी मैत्री झाल्यानंतर अतुलचे त्यांच्या घरी खूपदा येणे जाणे असायचे. या दोघी बहिणी लहानपणसून एकत्र खेळल्या वाढल्या त्यामुळे लग्न देखील एकाच मुळाशी करणार असं त्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेलं होतं. या दोघी बहिणी आणि त्यांची आई आजारी पडल्या त्या दरम्यान अतुल त्यांना दवाखान्यात घेऊन गेला त्या सर्वांची काळजी करू लागला. तेव्हापासून अतुल देखील या दोघींच्या प्रेमात पडला. इंजिनिअर आणि आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या दोघी बहिणींनी अतुल सोबत लग्नाची गाठ बांधली आणि हे लग्न चर्चेत आलं.

मात्र आता अतुल विवाहित होता हे या दोघींना समजले असल्याने या दोघींनी कायद्याचा आधार घेत दाद मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ‘सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरू आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापूर पोलीस अधीक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा’. आता हे सत्य समोर येताच पुढे काय होणार ह्याकडे सर्वांच्या नजर लागून आहेत.